Please enable javascript.अकोल्यात जोरदार गारपीट - rain,akole,rahuri - Maharashtra Times

अकोल्यात जोरदार गारपीट

Maharashtra Times | 1 Mar 2016, 3:00 am
Subscribe

नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस दुसऱ्या दिवशी सुरूच असून, सोमवारी अकोले तालुक्यात गारपीट होऊन शेतपीकांचे नुकसान झाले आहे. तर वीज कोसळून एक शेतकरी ठार झाला आहे.

rainakolerahuri
अकोल्यात जोरदार गारपीट
म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस दुसऱ्या दिवशी सुरूच असून, सोमवारी अकोले तालुक्यात गारपीट होऊन शेतपीकांचे नुकसान झाले आहे. तर वीज कोसळून एक शेतकरी ठार झाला आहे. गेल्या दोन दिवसांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील दोघांचा बळी गेला आहे. तर हवामान खात्याने पुन्हा गारपीटीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. रविवारी नगर तालुका, संगमनेर, अकोले, जामखेड या ठिकाणी पाऊस झाला होता. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर अकोले तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळासह पाऊस झाला. तर सुपारी एवढ्या आकाराच्या गारही पडल्या आहेत. त्यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा, टोमॅटो पिकांबरोबर फळबागांचे नुकसान झाले आहे. तर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वीरगाव येथे वीज पडून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. श्यामराव चंद्रभान वाकचौरे (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नगर शहराबरोबर तालुक्यांतील काही गावांमध्ये वादळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर रविवारी कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथे वादळी वाऱ्यामुळे स्नेहल लालासाहेब चौरे (वय ७) या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही मुलगी घराच्या छतावर असताना वादळामुळे घरावरून खाली असलेल्या पाण्याच्या हैदात पडली. लवकर मदत न मिळाल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला.

राहुरीत पावसाची पाचच मिनिटे हजेरी

म. टा. वृत्तसेवा, राहुरी

शहर व परिसरात सोमवारी दुपारी हलक्या पावसाने अवघी पाचच मिनिटे हजेरी लावली. ढगाळ हवामान व पावसाळी वातावरण तयार झाले होते. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सोमवारी दिवसभर वातावरणात दमटपणा जाणवत होता. पावसाचे वातावरण तयार झाले. दुपारी चारच्या सुमारास विजांचा कडकडाट व वाऱ्याने हजेरी लावली व काही क्षणातच पावसास सुरुवात झाली. अवघी पाचच मिनिटे हजेरी लावून पावसाने विश्रांती घेतली. या पावसामुळे रस्ते ओले झाले तर काही ठिकाणावरील पन्हाळेही वाहण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. वेधशाळेने ३ मार्च (गुरुवार) पर्यंत पावसाळी वातावरण राहील, असा अंदाज वर्तविलेला आहे. सध्या कांदा जगविण्याची धडपड शेतकरी करीत असून पाण्याअभावी पिके जळून चालली असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही क्षणानंतर ऊन पडल्याने ऊन व पाऊस असा खेळ पहावयास मिळाला.

विरगावात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी शिर्डी

जिल्ह्यातील अकोले व परिसरात सोमवारी दुपारी तासभर गारपीट झाली. पाऊसानेही झोडपले. डाळींब पिकावर फवारणी करत असताना वीज कोळसून ३२ वर्षांच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या गारपिटीने कांदा, डाळींब, भाजीपाला तसेच आब्याचा मोहर यांचे नुकसान केले.

दोन दिवसांपासून राज्यात मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात गारपीट झाली. सोमवारी नगर जिल्ह्यात अकोले व परिसरात तासभर गारा व पाऊस कोसळला. याच तालुक्यातील विरगाव या खेड्यात श्यामराव वसंतराव वाकचौरे (वय ३२) हा तरुण शेतकरी डाळींब पिकावर औषध फवारणी करत होता. अचानक आकाश भरून आले आणि विजांचा कडकडाट झाला. वाकचौरे यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतात काढणीस आलेल्या कांदा, डाळींब, टोमॅटो तसेच आंब्याचा मोहर यांचे प्रचंड नुकसान केले. रुंबोडी, इंदोरी, मेहंदूरी, उंचखडक, औरंगपूर, टाकळी, ढोकळी, विरगाव, शिवगाव बुद्रूक, शिवगाव खुर्द, कळस बुद्रूक, कळस खुर्द, मनोहरपूर, वाशिरे, कुंभेफळ आणि अकोले शहर या गावांना गारपिटीचा तडाखा बसला.
कॉमेंट लिहा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज